Sunday 19 August 2012

पुराणांची विश्वासार्हता

आजकाल हि एक ट्रेंड झाली आहे पुराणांना नावं ठेऊन त्यांच्यातल्या मिथकांची खिल्ली उडवायची. यामागचे कारण, राजनैतिक असो व इतर, पुराणामधील शुद्ध ऐतिहासिक मजकुरावर अन्याय करतं. 
दुर्दैवाने आज पुराणांना नावं ठेवल्यावर तुम्हाला 'पुरोगामी' असे म्हटले जाते. 
एकदा एका मित्राने मला विचारले होते " जगातले किती देश पुराण आणि वेदांचा अभ्यास करतात?" . माझं साधं सरळ उत्तर होतं, पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत.
बाकीच्या लोकांनी त्यांचे अध्ययन अक्र्ण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जरी ते करत नसले, तरी आपण ते केलेच पाहिजे कारण ते आपले ग्रंथ आहेत. हे कारण पुरेसे आहे, बाकीच्या कारणांची गरजच नाही.
त्रास हा आहे कि हिंदू धर्माशी निगडीत कुठलीही गोष्ट हि नेहमी मिथकाच म्हणून सांगितली जाते.

  • जेव्हा वासुदेव नि कृष्णाला नेले, तेव्हा यमुना बाजूला झाली हे मिथक आहे, पण जेव्हा मोसेस साठी इजिप्तचा समुद्र बाजूला झाला हि सत्य घटना आहे
  • रामायणात वानर बोलतात हे मिथक आहे, पण बायबल मध्ये कासव बोलतात हि सत्य घटना आहे
  • कुम्भ्करण खीप मोठा होता, हे मिथक आहे, पण बायबल मध्ये गोलीअथ मोठा होता हि सत्य घटना आहे
  • कृष्णाने जे चमत्कार केले ते मिथक आहेत, पण जीसस नि केलेले चमत्कार हि सत्य घटना आहे
  • आदिवासी असलेला वाल्मिकी रामायण लिहू शकत नाही, पण निरक्षर असलेला मोहम्मद मात्र कुराण सांगू शकतो.
  • भीम आणि अर्जुन खूप बलवान होते हे मिथक आहे, पण सॅमसन आणि डेविड खांब तोडू शकत होते हि सत्य घटना आहे
  • सापांपासून प्रल्हाद बचावला हे मिथक आहे, पण बायबल मध्ये एक माणूस सिंहाच्या गुहेतून बचावतो हि सत्य घटना आहे
  • युधिष्ठीर जिवंत स्वर्गात जाने हे मिथक आहे, पण मोहम्मद घोड्यावर स्वर्गात जाणे हि सत्य घटना आहे 
प्रत्येक धर्मात असेच मिथक असतात पण फक्त हिंदू धर्मातल्या गोष्टींना खोटे ठरवले जाते. 

पुराणाच्या विश्वासार्हतेच बोलायचं तर मी कोएनराड एल्स्ट हे काय म्हणत आहेत हे सांगतो--
"To the neglect of the legitimate history books, the ItihAsa-PuraNa literature, i.e. the Epics and the Puranas is like ignoring the historical Bible books (Exodus, Joshua, Chronicles, Kings) to draw ancient Israelite history exclusively from the Psalms, or like ignoring the historians Livius, Tacitus and Suetonius to do Roman history on the basis of the poet Virgil.  What would be dismissed as “utterly ridiculous” in Western history is standard practice in Indian history. 

No serious historian would ignore the Exodus narrative simply because it also contains unhistorical episodes like the Parting of the Sea and the voice from the Burning Bush..So, if Biblical history can be accepted as more than fantasy, the same credit should be given to the historiographical parts of the Epics and Puranas."

पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत,त्यात आपल्या लोकांची माहिती आहे, आपल्या राजांची,आपल्या ऋषींची,आपल्या राज्यांची. ते आपल्या भूमीवर लिहिले गेले, आपल्या पूर्वजांनी लिहिले, आपल्या संस्कृत भाषेत लिहिले. त्यामुळे हि फक्त आपलीच जबाबदारी आहे कि त्या ग्रंथांचे संवर्धना करण्याची व त्यांच्यातला ऐतिहासिक मजकूर बाहेर आणण्याची. 
हे दिवस हिंदू धर्मासाठी फार संकटाचे आहेत. आपल्या धर्मावर चारी दिशांनी हल्ला होत आहे. पण जसं मुन्डोक उपनिषद म्हणते, " सत्यमेव जयते"  विजय हा नेहमी सत्याचाच होतो. 

राजघराणी

मी माझ्या वंशावळी मध्ये प्रमुख राजघराणी घेतली आहेत. हि राजघराणी सुर्यवंश व चंद्रवंश अशी विभागली आहेत.

सुर्यवंशात इक्ष्वाकू,विदेह,वैशाली,ई घराणी येतात. हा सुर्यवंश वैवस्वत मनु पासून उत्पन्न झाला. मनूचा अजून एक मुलगा होता- शर्याती,ज्यापासून आनर्त (गुजरात) देशाचे राजघराणे उत्पन्न झाले. पण ते राजघराणे मी नाही घेतले.
चंद्रवंश मध्ये पौरव, यादव,तुर्वासू,द्रुह्यु,अनु, उत्तर व दक्षिण पांचाल,काशी,ई राजघराणी येतात.
हि सोडल्यास अजून बरीच घराणी आहेत पण पुराण त्यांची माहिती देत नाहीत, कदाचित त्या त्या राजांची नावे माहित नसल्याने पुराण यावर काहीच बोलत नाहीत. अजून म्हणजे अनेक राजांच्या व ऋषींच्या कथा आहेत त्यात बर्याच अनाकलनीय गोष्टी आहेत. पण एक लक्षात ठेवले पाहिजे कि पुराण हे मौखिक रूपाने पुढे जात होते आणि पुराणिक लोक दरबारात किंवा सभा जिंकायला या कथा रंगवून सांगत, म्हणून ज्या अनाकलनीय गोष्टी येतात, त्या आपण दूर ठेवू.  त्याच बरोबर शैव आणि वैष्णव यांच्यातले बौद्धिक वैर असल्याने बऱ्याच कथांना शंकर, विष्णू,देवी, सूर्य,ई देवतांबरोबर जोडण्यात आले. 
कितीही चीड येत असली तरी हेच सत्य आहे कि बऱ्याच घराण्यांबद्दल पुराण माहिती देत नाहीत. पण आपण पुराणकारांना धन्यवाद म्हटले पाहिजे कारण ते थोड्या तरी घराण्यांची माहिती देतात, ती कितीही तुटकी असो, कितीही मिथकांनी भरलेली असो, निदान तेवढी तरी माहिती आपल्याकडे आहे. आणि ते पण ,हि माहिती कुठेही न लिहिता पिढ्या न पिढ्या मौखिक रुपात आपल्याकडे आली आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
पुराण ज्या घराण्यांबद्दल जास्त माहिती देत नाहीत ती आहेत- सिंधू-सौवीर, अंग, वंग,कलिंग,विदर्भ,चेदी,गांधार,मत्स्य,केकय,मद्रा,शिवी,ई.
मध्ये मध्ये या घराण्यांच्या राजांची नावे येतात पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण वंशावळीत ते राजे कुठल्या काळात होते हेच आपल्याला माहित नाही. त्यावर ज्या घराण्यांच्या राजांची नावे आपल्याकडे आहेत त्यात सुद्धा काही नावे गायब आहेत. उदा- पौरव घराणे- त्यात निदान ४० नावे गायब आहेत. त्यामुळे त्या जागी '?' टाकणे भाग आहे.
पण काहीच नसण्यापेक्षा थोडे असलेले कधीही बरं.
पुराण आणि इतिहास ग्रंथ नसते तर आपण आपल्याच इतिहासाबाबत किती आंधळे असतो याचा विचार करा. ते नसते तर खरच आपण विश्वास ठेवला असता कि आपला इतिहास हा हडप्पा संस्कृतीपासून सुरु झाला, आपले ग्रंथ १ल्या सहस्त्रक BC मध्ये लिहिले गेले आणि खरच कोणीतरी आर्य आपल्या देशावर धावून आले. एका पोकळ आर्य सिद्धांतावर विश्वास ठेऊन आपण खूप गमावले आहे. आता आपल्या देशाचा खरा इतिहास बाहेर आणायलाच हवा..
तेच करायचा माझा हा छोटा प्रयास.

मनु व मन्वंतर

मी दिलेल्या वंशावळी या सगळ्या वैवस्वत मनु पासून सुरु होतात. वैवस्वत मनु हा ७वा मनु होता. त्याआधी झालेले सहा मनु म्हणजे स्वायंभुव,स्वारोचिष,उत्तम,तामस,रेवत आणि चाक्षुष.
पुराणांनी दिलेल्या माहितीनुसार गेले, तर सर्वात प्राचीन व्यक्ती जिचा उल्लेख येतो ती आहे पहिला मनु- स्वायंभुव.त्या आधी कोण होते हे पुराणांना माहित नाही, कदाचित स्वायंभुव मनु नंतर इतिहास संवर्धन चे महत्व कळले असावे म्हणून स्वायंभुव पासून ऐतिहासिक माहिती जतन करण्यास सुरुवात केली गेली असावी.
एका मनूच्या राज्यकाल हा ७१ महायुग असतो असे म्हटले जाते. एका महायुगात ४ युगे येतात ज्यांची नावे सतयुग,त्रेतायुग,द्वापरयुग आणि कलियुग ज्यांच्या वर्षांची संख्या एकत्रित ४३२०००० वर्षे इतकी येते. पण हि संख्या खूप मोठी आहे व हे ब्रह्मांड किती प्राचीन आहे हे सांगायला केलेली एक प्रणाली आहे. युग प्रणाली हि काळाच्या मोजमापासाठी बनवली गेली आहे. महाभारत (६.१०) मध्ये संजय सांगतो आधी एक महायुग फक्त १०००० वर्षांचे असायचे. त्यात २००० वर्षांचा संधिकाल जोडून ते १२००० वर्षांचे झाले असे मार्कंडेय महाभारत (३.१८७) मध्ये सांगतो. 
पण त्यानंतर हि १२००० वर्षे मानवी वर्षे नसून दिव्य वर्षे आहेत असे मानले गेले.
१ दिव्य वर्ष= ३६० मानवी वर्षे
त्यामुळे या १२००० वर्षांना मानवी करायला ३६० नि गुणण्यात आले ज्यावरून ४३२०००० हि संख्या आली.
म्हणजे खरं बघितलं तर एक महायुग हे फक्त १०००० वर्षांचेच आहे.
पण या युग प्रणाली मागचे गणित सुद्धा बघा. सतयुग,त्रेतायुग,द्वापरयुग आणि कलियुग यांची अनुक्रमे वर्षे ४:३:२:१ या ratio मध्ये येतात. म्हणजेच ४०००,३०००,२०००,१००० अनुक्रमे.
मन्वंतर या विषयावर परत येऊ. मला असे वाटते कि एक मन्वंतर चा काळ आहे तो काळ त्या मनुने किती काल राज्य केले यावरून ठरत असे व ७१ महायुगांच्या त्याच्याशी काही संबंध नाही. कारण मनुष्य तेवढा काल जगूच शकत नाही. त्यामुळे एक मन्वंतर हे तो मनु किती वर्ष जगला अथवा राज्य केले यावर ठरत असावे.
एका मन्वंतर ची विशेष लक्षणे असतात कि प्रत्येक मन्वंतरात १ इंद्र, देवगण, ७ सप्तर्षी, मनुपुत्र ई हे लोक मनुबरोबर त्याला शासन करायला मदत करतात.

वैवस्वत मनूच्या पूर्वजांविषयी बोलायचे तर त्याचे पूर्वज होते पुढीलप्रमाणे-
ब्रह्म-->मरीची-->कश्यप-->विवस्वान-->वैवस्वत मनु 

पुराणांच्या मते वैवस्वत मनु द्रविड देशावर राज्य करायचा व त्याची राजधानी होती कांचीपुर. 
मत्स्यावतार च्या वेळी झालेल्या महापुरातून तो बचावला व त्याने उत्तरेला जाऊन अयोध्या नागरी शरयू नदीच्या काठी वसवली. आता मत्स्यावतार झाला का नाही, पूर आला का नाही यापेक्षा मनु द्रविड देशातून उत्तरेकडे गेला हि माहिती महत्वाची आहे. तिकडे मनु पासून बरीच घराणी उत्पन्न झाली. त्यांना सुर्यवंश म्हणत.
त्याच वेळी सरस्वती च्या काठी प्रतिष्ठानपूर इथे चंद्र हा राजा राज्य करत होता. त्याचा मुलगा बुध. या बुधाने वैवस्वत मनु च्या मुलीशी, इलाशी, विवाह केला आणि त्यांच्यापासून चंद्रवंश सुरु झाला. 
अशा प्रकारे आपल्या इतिहासातील दोन मुख्य घराणी सुरु झाली.

वैवस्वत मनु ते महाभारत पर्यंत झालेले राजे

मी स्वतः बनवलेल्या विविध राजघराण्यांच्या वंशावळी या एक्सेल फाईल मध्ये आहेत.त्यात काही सेल हे पिवळ्या रंगाचे आहेत ज्यावरून तो राजा कुठल्यातरी दुसर्या घराण्यातल्या राजाच्या समकालीन आहे हे समजते. विविध सेल मध्ये कमेंट टाकल्या आहेत 
जी वेगवेगळी घराणी घेण्यात आली आहेत ती आहेत- इक्ष्वाकू (अयोध्या), पौरव , कान्यकुब्ज  , यादव , हैहेय, उत्तर पांचाल , दक्षिण पांचाल ,द्विमिढ,मगध , अनु , द्रुह्यु , तुर्वासू , काशी ,विदेह , वैशाली 


विविध राजघराण्यांची वंशावळ